रविवार, १९ जानेवारी, २०१४

मला घराबाहेर पडायलाच हवं.

कुंपणाच्या तटबंदीत
घराचा बालेकिल्ला झालाय...
अंगणात पाणीही साचलंय खूप.

आता वाटा निसरड्या झाल्या असतील...
बाहेर पडेन तेंव्हा
पाऊल जपून टाकायला हवं.
चौकटीचा हा येवढा खंदक
पार झाला की झालं,  
... आलंच आपलं गाव.

किती दिवस... किती महिने
एव्हाना किती वर्षे उलटून गेली असतील....
मी घराबाहेर पडलो नाही.

असा आलो आत
आणि गुंतून पडलो घरातच
साधताच आला नाही मुहूर्त
या इथून निघण्याचा.
निमित्ते शोधत वाट पाहत राहिलो
वेळ येण्याची...

ती आलीच नाही
मात्र आता
उरल्या सुरल्या दिवसांची
मौज लुटायला
मला घराबाहेर पडायलाच हवं.


२१.०२.२०१२ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!