मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

रडू नकोस....

रडू नकोस इतक्यात
अजून खूप चालायचंय तुला

आभाळ तोलून धर तळहातांवर
गारठा थोपवून ठेव
त्वचेच्या सछिद्र दारातच .
पायात बळ शाबूत ठेव
हे आत्ताचं वादळ ओसरेपर्यंत .

पण मरेपर्यंत असाच वागू नकोस
म्हणजे झालं .

कारण ...
विस्तवाची आगही होते ...
... आणि राखही .

...मित्रा ...
मला ठावूक आहे ...
तू धगधगतो आहेस .

- गजानन मुळे
३०.०१.२०१२.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!