बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

आई

आई
ती गेल्यानंतर मजला
 'कोणी नाही'  कळले
आयुष्य माझे सारे
समिधा होऊन जळले

जळली स्वप्नफुलेही
अक्रोशीत नेत्र वितळले
मज पदोपदी वाटेवर
श्वासाने निर्दय छळले

घडली पुढ्यात पापे
रक्त न कधी उसळले
मिसळले कशामध्ये ते ..
कुणीकडे ते वळले ...?

या शब्दांना मी माझ्या
जगतावर उगा उधळले
कधी उष्टावल्यावरी मी
कवितेने मला विसळले

'ती नाही ' म्हणूनी माझे
प्रारब्धच अवघे मळले
मी फिरता माझ्यामधुनी
अस्तित्त्व तिचे आढळले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!