सोमवार, २३ एप्रिल, २०१२

पाचू पेरल्या रानातून .....


पाचू पेरल्या रानातून कधी केला नाही प्रवास...
आकाशाच्या पांघरुणात कधी निजलो नाही निवांत.
स्वप्नांच्या लुकलुक चांदण्या मात्र
सदैव दाटून राहिल्या पापण्यात.
पायतळीची वाट विस्कटून गेली कित्येकदा....
पायांसकट उन्मळून पडलोही कधी ...
पण मूळं होती पक्की लोचट म्हणून वाचलो.
जमिनीशी लगट करून
त्यांनीच तर उभं केलं पुन्हा जमिनीवर.

आता फुटते आहे पालवी हळूहळू....
आणि आभाळही भरून येतं अधूनमधून....
स्वप्नांच्या चांदण्या मात्र ढळत नाहीत कधीच
टप्पोर गार गार थेंबांसोबत मुसळधार पावसातही....

म्हणूनच मी कदाचित जगत असेन ...!
किंवा ...
जिवंत असेन...!!  

-    गजानन मुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!