आता हमरस्त्यावर मांडून
संसार
डोळ्यात विझलेला गाव घेऊन
पायांखालची जमीन शाबूत
ठेवायची.
कधी भेटलेच हाताला काम
तर घामाला किंमत असते
म्हणायचं.
नसलेल्या देवाला हाका देवून
तरी
काय उपयोग ?
पाणी पापण्यात आहे...
तेवढंच आपल्या हक्काचं
रोज ढाळायचं
आणि मरण टाळायचं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!