तसं सहजच होतं जगणं
फुलांसारखं ...मुलांसारखं
भिरभिर पाखरांसारखं
माड उंच जात होते ..
पतंग गोते खात होते ...
अधून मधून पाऊस होता ....उन्ह होतं
शेवटपर्यंत सोबतीला मन होतं
सोनेरी क्षण
ओंजळीतून
घरंगळन्याआधीची ही गोष्ट .
आता कुठे
नुसतं ' खुट्ट' झालं तरी
भीती वाटते .. विनाकारण
काय कारण ....?
- गजानन मुळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!