शुक्रवार, २९ जुलै, २०११

दिवसास माझे


दिवसास माझे

दिवसास माझे किती हे दिलासे
तरी प्राण माझा करतो खुलासे
तुझी स्तब्धता ही दाटून येते
होतात हे शब्द माझे खुलासे

किती काळची ही असे स्तब्धता
तू जाता उरते कशी व्यर्थता
कसे चांदण्याचे मिटतात डोळे
तू दिसतेस तेव्हा होई सार्थता

घेऊन फिरतो मी ओळी कुणाच्या
बरसतात रात्री वेड्या घनांच्या
हळूवार आणि हळू बोलतो मी
कशा या वेळा कातर मनाच्या

कवडसे उन्हाचे मला जाळतात
सावल्याही मला का टाळतात
हरवून जाईल आता शून्यताही
इशारे कुणाचे कसे पाळतात

आता सांज होईल तुझ्या आठवांची
कविता बनावी जसी आसवांची
लिहुनी मिटावी जशी चार पाने
तशी न्यूनता ही तुझ्या लोचनांची

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!