रविवार, ८ मे, २०१६

आठवणींना नसतो शेवट

आठवणींना नसतो शेवट
सुरुवातही नसते कुठेच
तरंगताना मन कधी
ढग होऊन सोबत करताना
हात लावताच विरणाऱ्या
गडद जांभळ्या वातावरणात
मनभर पसरणाऱ्या

जुन्याच वळणावर
नव्याने घसरणाऱ्या

रोजच्या धांदलीत
नकळत विसरताना
आठवतात
आठवणीं
कुठे दुरवर
करतात पाठवणी.


२८.२०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!